VBA Women’s Front supports Mahabodhi Mahavihar Mukti Grand Peace March
चंद्रपूर :- समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि आंबेडकर चळवळीतील विविध राजकीय, सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व बौद्ध विहार आणि बौद्ध परिषदांच्या सहकार्याने बिहारमधील बोधगया महाबोधी महाविहाराच्या मुक्ततेच्या न्याय्य मागण्यांसाठी शुक्रवार 25 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता डॉ. आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य शांती मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. Bodhagaya Mahabodhi Mahavihar Mukti Grand Peace March या मोर्चाला पाठिंबा जाहीर करण्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या शहर अध्यक्षा तनुजा रायपूरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. Vanchit Bahujan Aaghadi Women’s front
शहर अध्यक्षा रायपुरे म्हणाले, बौद्धगया येथील महाविहार हे बौद्ध धर्माचे एकमेव जागतिक दर्जाचे धार्मिक स्थळ आहे, ते अद्याप बौद्धांच्या नियंत्रणाखाली नाही हे चिंतेचा विषय आहे. भारतीय भिक्खू संघाने 12 फेब्रुवारीपासून एक चळवळ सुरू केली आहे. त्याला अनेक देशांकडून पाठिंबा मिळत आहे. यासाठी केवळ भारतातच नाही तर जगभरात शांततापूर्ण निदर्शने होत आहेत. हे जागतिक वारसा स्थळ बौद्धांना सोपवावे आणि 1949 चा कायदा रद्द करावा या मागणीसाठी हे आंदोलन केले जात आहे.
तनुजा रायपूरे यांनी पत्रकार परिषदेद्वारे हजारो बौद्ध आंबेडकर अनुयायांना शुक्रवार दिनांक 25 रोजी होणाऱ्या शांतता मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी संदिप देव जिल्हा उपाध्यक्ष युवा आघाडी तथा चंद्रपूर महानगर निरीक्षक, मोनाली पाटील शहर उपाध्यक्षा, इंदू डोंगरे, सुलभा चांदेकर, शोभा वाघमारे, कल्पना भसारकर, विश्रांती डांगे, छाया वाघमारे आदींची उपस्थिती होती.
