Tuesday, March 25, 2025
HomeMaharashtraअमृत जल योजनेचे कनेक्शन लवकरात लवकर सुरू करा

अमृत जल योजनेचे कनेक्शन लवकरात लवकर सुरू करा

Start Amrut Jal Yojana connection immediately,                                                  BSP District President demands to MNC

अमृत जल योजनेचे कनेक्शन लवकरात लवकर सुरू करा : बसाlपा चे जिल्हाध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार यांची मागणी

चंद्रपूर :- कोट्यवधी रुपये खर्च करून महानगरपालिका प्रशासनाने चंद्रपूर शहरात अमृत जल योजना सुरू केली. योजनेच्या माध्यमातून संपूर्ण शहरात पाण्याची पाईप लाईन टाकण्याची व्यवस्था करण्यात आली. तरीसुद्धा शहराच्या अनेक भागात अमृत जल योजनेची पाईप लाईन पोहोचलीच नाही. आणि ज्या भागात पाईप लाईन पोहोचली त्या भागात नळ कनेक्शन सुरू करण्यात आले नाही. विशेषता: चंद्रपूर शहराच्या महाकाली कॉलरी ,बाबुपेठ व पठाणपूरा या प्रभागात अजूनही अमृत जल योजनेचे कनेक्शन् सुरू केले नाही.

या प्रभागातील लोकांना पाण्यासाठी दर दर भटकावं लागत आहे.. इतर कोणतेही पर्याय पाण्यासाठी या प्रभागात उपलब्ध नसल्यामुळे, आज बहुजन समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार यांच्या नेतृत्वात तिन्ही प्रभागाच्या महिला मोठया संख्येने चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल यांना अमृतजल योजनेचे कनेक्शन महाकाली कॉलरी, बाबुपेठ व पठानपुरा या भागात लवकरात लवकर सुरू करण्याबबत चर्चा करण्यात आली.

सकारात्मक चर्चे नंतर या समस्येसंबंधीचे निवेदन आयुक्त यांना देण्यात आले..

यावेळी बहुजन समाज पक्षाचे चंद्रपूर शहराचे अध्यक्ष अमोल राहुलगडे, घुगुस शहराचे अध्यक्ष सिद्धांत कोंडागुर्ला, प्रशांत रामटेके, अखिल निमगडे इतर बसपा कार्यकर्ता व महाकाली कॉलरी, पठानपूरा व बाबुपेठ परिसरातील महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular