Thursday, April 24, 2025
HomeAgricultureहंसराज अहीर यांच्या प्रयत्नाने ४ गावातील शेतकऱ्यांना दिलासा

हंसराज अहीर यांच्या प्रयत्नाने ४ गावातील शेतकऱ्यांना दिलासा

Efforts of Hansraj Ahir, relief to the farmers of 4 villages

चंद्रपूर :- राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर Hansraj Ahir यांच्या विशेष पुढाकाराने अखेर वेकोलि बल्लारपूर क्षेत्रांतील गत ३ वर्षांपासून प्रस्तावित असलेल्या गोवरी सेंट्रल परियोजनेकरीता सीबी ॲक्ट  सेक्शन ४ ची अधिसुचना कोल मंत्रालयाने जारी केली आहे-

सदर प्रलंबित परियोजनेस पी-आर मंजुरीपासून तर कॉस्ट प्लस खरेदीदार करारनाम्यापर्यंत सेक्शन ४ करीता प्रस्तावित करण्यापासून तर अधिसूचना जाहीर होईपर्यंत प्रकल्पग्रस्तांनी भाजपा किसान आघाडीचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजू घरोटे  यांच्या नेतृत्वात संबंधित प्रकल्पग्रस्तांनी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांची प्रत्यक्ष भेट घेवून गोवरी सेंट्रल परियोजनेच्या कार्यान्वयनातील अडसर दूर करण्याची मागणी केली होती. Notification of section 4 of Gowri Central Project, pending for three years, released

या मागणीची गांभीर्याने दखल घेत प्रकल्पग्रस्त बहुसंख्य ओबीसी शेतकरी व इतरांना न्याय मिळण्याकरीता अहीर यांनी याप्रश्नी दि- 28 जून 2023 रोजी, यापूर्वी व सातत्याने कोल इंडिया चेअरमन, चंद्रपूर जिल्हाधिकारी, वेकोलि सीएमडी, तसेच बल्लारपूर क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक यांच्या संयुक्त बैठकीत आयोगाची सुनावणी घेवून गोवरी सेंट्रल परियोजनेच्या कार्यान्वयनातील अडसर दूर करण्याचे तसेच रवीभवन, नागपूर येथे व जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे सुध्दा मार्च 2024 रोजी घेतलेल्या एनसीबीसीच्या सुनावणीत या प्रकरणी तातडीने कार्यवाहीचे निर्देश जारी केले होते.

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या निर्देशानुसार वेकोलि नागपूर मुख्यालयाने कोल इंडियाद्वारा या परियोजने संदर्भातील प्रकल्प अहवाल] मंजूर करवून घेत कोळसा खरेदीकरीता दि- 06 जून 2024 रोजी एनटीपीसी व वेकोलि दरम्यान कॉस्ट प्लस व खरेदीदार करारनाम्यावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत- या करारामुळे आता गोवरी सेंट्रल परियोजनेच्या कार्यान्वयनास मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच कोल बेअरींग एक्ट 1957 नुसार भूमि अधिग्रहणाकरीता सेक्शन 7 ची अधिसुचना जारी करण्यास क्षेत्रीय कार्यालयाव्दारे मंत्रालयीन स्तरावर प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे- त्यामुळे वेकोलिच्या उदासिनतेमुळे मागील 3 वर्षापासून थंडबस्त्यात पडलेला गोवरी सेंट्रलचा प्रश्न अखेर मार्गस्थ झाला आहे- हंसराज अहीर यांच्या या उपलब्धीमुळे प्रकल्पप्रभावित गोवरी] गोयेगांव] अंतरगांव] माथरा, खामोना, आर्वी येथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून  प्रकल्पग्रस्त शेतकरी ज्ञानेश्वर पिंपळकर, महादेव हिंगाने, अखिलेश लोनगाडगे, भुपेश जुनघर, योगेश खोके, संजय उईके, पवन उईके, विठ्ठल भोयर, संतोष उईके, केतन खोके व अन्य प्रकल्पग्रस्तांनी हंसराज अहीर यांची भेट घेवून त्यांचा सन्मान करीत आभार मानले व वेकोलि मुख्यालयाचे सुध्दा आभार मानले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular